Pik Vima News : 22 जिल्ह्यातील 54 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई…2 दिवसात मिळणार पिक विमा
Pik Vima News:- शेतकऱ्यांची खरिपातील पीकविम्याची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकविल्यामुळे २२ जिल्ह्यांतील जवळपास २१६० कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली होती. ही भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मंजूर करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्य सरकार आगामी दोन दिवसांत विमा कंपन्यांना ७०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता देणार असून, यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा होण्यास सुरुवात होईल. खरिप २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान खरिप २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिली होती. त्यानंतर झालेल्या पंचनाम्यांनुसार, राज्यातील ५४ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर झाली. मात्र, राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना हिस्सा मिळाला नसल्याने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नाही. पेरणी न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारचा हप्ता आवश्यक आहे. कृषी व...
Comments
Post a Comment